ल ग्न झाल्यापासून माझा "इ संचार" बराचसा कमी झालाय अशी तक्रार मी माझ्या मित्र-परिवारा कडून ऐकत आहे. पण खर सांगू का...हल्ली मी या गोष्टींचा फारच धस्का घेतलाय. एक ते ऑरकुट कमी म्हणुन का काय ,फेसबुक, माय-स्पेस ,ट्वीटर इत्यादी गोष्टींना ऊत आला आहे . इथे घरातली आणि बाहेरची कामे उरकता उरकता नाकी नऊ येतात, त्यात अजून "आज बाजारात भाजी महाग/स्वस्त मिळाली हो " किंवा "आत्ता माझी रजा साहेबानी रद्द केली हो "असला 'ट्वीट' करून जगभर जाहिरात करायचा विचार खरच मनातही येत नाही.
पण अगदीच ' ब्याक्वर्ड ' झालोय हल्ली आपण असा विचार येऊन आज माझ्या पहिल्या ब्लॉगचा मी श्री गणेशा करायचे ठरवले. बदलत्या काळाबरोबर बदलायला हे हवेच, नाही का? अर्थात ब्लॉग लिहायच्या मागे नुसती : आपण काळाबरोबर बदलत नाही , एवढी भीतीची भावना नव्हती. माझ्या अनेक जवळच्या लोकांचे सुरेख ब्लॉग वाचायचा योग अशात आला ...आणि वाटले - की काय हरकत आहे अधून मधून आपणही थोड़े लिहायला !!!
जेव्हा लिहायला बसले तेव्हा ह्या ब्लॉगचे नुसते नाव ठरवण्यात मी तब्बल १ -१.५ तास खर्ची पाडला...भपकेदार, सामान्य , टुकार, फिक्कट अशी अनेक बिरुदे लावून मी अनेक संभाव्य नावांना मोडीत काढले .एकूण अंदाज आला आहे की वाटते तितके ब्लॉग हे प्रकरण लिहिणे सोपे नसावे . "घर पहावे बांधून अन् लग्न बघावे करून " इतकेच "ब्लॉग पहावा लिहूनही" अवघड आहे! आज लिखाणाचा पहिलाच दिवस आहे , म्हणुनच ओढून ताणून अजून पाल्हाळ लावत नाही.
आणि हो --ब्लॉग आवडला की नाही याची नोंद जरूर करा !! आपला सर्वांचा अभिप्राय अर्थातच बहुमूल्य आहे . राम राम . आजच्या साठी एवढच. पुन्हा भेटूच !
II इति वार्ता: II
Apratim...Aj aai baddal vichar karayla jithe manasanna vel kadhava lagto,tya jagat tujha sarkha uttam vichar mandanarya ani aplya aai baddal cha abhiman jaga samor manapoorvak sadar karnarya "aaivedya" lekhana baddal abhinandan !
ReplyDeleteHardik swagat....
ReplyDeleteani
All the best :) :) :)
Khupach chan!! Mi tuze sagale blogs eka damat wachale :) Asech chan prasang, aathawani aani bhawananni tuze blogs sampanna howot hi sadiccha!!
ReplyDelete